मराठ्यांच्या इतिहासात पेशवे पद पूर्वी पासुन असले तरी ते प्रत्यक्ष राज्यकारभार करत नव्हते. त्या पदास प्रथम सत्तेच्या केंद्रस्थानी आणले ते बाळाजी विश्वनाथ भट यांनी. ते मुळचे श्रीवर्धनचे (कोकण) होते. औरंगजेबाच्या कैदेतून परत आलेल्या शाहू ला त्याने मदतीचा हात दिला, त्यामुळे छत्रपती शाहू त्याच्या मृत्युनंतर बर्याच जणांचा विरोध डावलत त्याचा मुलगा बाजीराव यास पेशवे पद दिले. पहिला बाजीराव हा अतिशय पराक्रमी निघाला येथुन ते पद वंशपंरपंरागत बनले.
बाळाजी विश्वनाथ पेशवे यांचा दसरा मुलगा चिमाजी अप्पा हे सदैव बाजीराव सोबत राहिले. त्यांना ही दोन मुले झाली. ते सदाशिव राव भाऊ व रघुनाथराव. बाजीराव पेशवे यांच्या मृत्युनंतर त्यांचा मुलगा नानासाहेब हे पेशवे बनले. पण पुढे नानासाहेबास ३ मुले झाली. विश्वास राव , माधवराव , नारायणराव.
पानिपताच्या तिसर्या युद्धात मराठ्यांची मोठी हानी झाली. स्वतः सदाशिव राव भाऊ व विश्वास राव हे लढाईत मारले गेले. या धक्क्यानंतर कालांतराने नानासाहेब पेशवे दगावले. यावेळी अशी परिस्थिती होती, नानासाहेब पेशवे यांचे वरिष्ठ पुत्र विश्वास राव जिवंत नव्हते. सर्वात वरिष्ठ होते ते रघुनाथ राव होते. पण पेशवे पद वरिष्ठता न बघता वंशपरंपरा ठेवत, नानासाहेबांचे दुसरे पुत्र माधवराव यांकडे आले. माधवराव पेशव्यांचाही २७ वर्षाच्या आयुष्य जगुन विनासंतान मृत्यु झाला. यानंतरही पेशवे पद त्यांच्या भावाला नारायण रावांना दिले गेले. मुळात या काळात सर्वात कर्तबगार ठरत मराठा साम्राज्य रघुनाथरावांनीच वाढवले होते. अटकेपार जाणे ही म्हण त्यांच्या पराक्रमामुळेच पडली. (सद्ध्या अटक पाकिस्तानात आहे.) पेशवे पदापासुन दोनदा डावलले जात पोर्सवदातरुनांना पेशवेपद दिल्याने ते नाराज झाले. त्याला इतर काही मंडळींनीही खतपाणी घातले.
यामुळे काहीसे लहरी वागत माधवराव पेशवे यांच्या काळापासुनच त्यांचे काका असणारे रघुनाथराव ह्यांचे पेशवेपदासाठी प्रयत्न चालु होते. अखेर आपल्या हयातीतच माधवराव पेशवे यांनी रघुनाथरावांना शनिवारवाड्यात बदामी महालात कैदेत ठेवले होते. माधवराव पेशवे यांच्या म्रुत्युने त्यांची सत्ता लालसा वाढली. व नारायणराव पेशव्यांच्या विरोधात त्यांनी बंड करण्याचे ठरवले. शनिवार वाड्याचे सुरक्षारक्षक गारद्यांना फितव्य्न त्यांनी नारायणराव पेशव्यांना कैद करायचा कट आखला. याचा काहीसा संदेह जरी पेशव्यांकडील मंडळींना असला, तरी गारदी खुद्द पेशव्या विरोधात काही आगळीक करण्याची शक्यता इतकी तीव्र वाटली नाही. कारण इब्राहिम गारदीने पानिपतावर पेशव्यांकडुन लढत अतुल्य पराक्रम गाजवला होता. अखेर अब्दालीने त्याला जिवंतपकडले तरी हालहाल करत मारले. म्हणुन त्यानंतर कौतुक म्हणुन शनिवार वाड्याची सर्व सुरक्षा माधवराव पेशवयांनी गारद्यांकडेच दिली होती. पण रघुनाथरावाच्या पत्नी आनंदीबाई यांनी गारद्यांना पाठवलेल्या चिठ्ठ्तील मजकुर " नारायण रावांस धरावे" ऐवजी " नारायण रावांस मारावे" असा केला. मराठीतील ध चा मा करणे ही म्हण याच प्रसंगावरुन पडली. गारद्यांनी चिठ्ठीनुसार नारायणराव पेशव्यांची हत्या केली. नारायणरावांच्या हत्येनंतर रघुनाथरावा पेशवेपद मिळाले. पण ते तात्पुरते ठरले. त्यांच्या विरोधात बंड तर झालेच शिवाय नारायणरावांच्या हत्येनंतर जन्माला आलेल्या मुलालाच पेशवा बनवले गेले..
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा