वडगावची लढाई मराठे व इंग्रज यांच्यामध्ये पुण्यापासून साधारणपणे ४० किमी दूर असलेल्या वडगाव या ठिकाणी झाली. याला पहिले मराठा - इंग्रज युद्ध म्हणुन सुद्धा ओळखले जाते. मराठे - इंग्रज यांत एकूण तीन युद्ध झाली. भारताच्या इतिहासात या ३ लढाया अतिशय महत्वाच्या आहेत. या लढाईत मराठ्यांचे नेतृत्व महादजी शिंदे यांनी केले. मराठ्यांनी या लढाईत शिस्त आधुनिक डावपेच यांचे प्रदर्शन करुन इंग्रजांना परास्त केले व अखेरीस जेरीला आलेल्या इंग्रज फौजेचा वडगाव येथे पराभव केला. इंग्रजांना या पराभवामुळे मराठ्यांशी तह करावा लागला. परंतु इंग्रज गव्हर्नर यांनी हा तह नामंजूर करत युद्ध चालू ठेवले
पावसाळा संपल्या नंतर इंगजांनी मुंबई हून साधारण ४००० फोज घेत प्रयाण केले. रघुनाथ रावांचे सैन्य त्यांच्या सोबत होते. इंगजांच्या सैन्यात ६०० युरोपियन तर उरलेले भारतीय सैनिक होते. रघुनाथ रावांना व इंगजांना वाटत होते की शिंदे, होळकर हे पुण्याच्या आसपास त्यांनाच येउन मिळतील. इंग्रजांचा पणवेल मार्गे , कर्जत - खंडाळा - पुणे असा मार्ग होता. मराठा सैन्याचे नेतृत्व महादजी शिंदे यांनी केले, होळकर ही मराठा सैन्यासोबतच राहिले. त्यामुळे रघुनाथ रावांचे बेत फसले. यावेळी मराठ्यांच्या सैन्य हालचाली वाखाणण्या सारख्या होत्या. कार्ले, खंडाळा, या भागात इंग्रज पोहोचे पर्यंत त्यांना गनिमी काव्याने सतावण्याचे काम केले. इंग्रज फौजेवर सतत चे गनिमी हल्ले करत त्यांची रसद मिळण्याचे मार्ग कापले. इंग्रज फौज जसजशी पुढे सरकत होती, मराठ्यांनी वाटेतली सर्व गावे ओस केली, शेते पिक कापुन जाळून टाकली, शिवाय पाणवठे विष टाकून पाण्यायोग्य ठेवले नाहीत, अशावेळी अन्नासाठी इंग्रज फौजेला आशा ठेवत पुढे पुढे चालत राहावे लागले. रात्रीवेळी सुद्धा छोटे हल्ले करत त्रास देणे सुरु ठेवले, तरीही चिकाटीने इंग्रज फौज खंडाळ्याला आली. खंडाळ्यालाआल्या वर मात्र इंग्रज फौजेला त्रास न देता मराठ्यांनी घाट चढु दिला, हेतू हाच होता की परतीचा मार्ग कापला जावा. यादरम्यान उत्तर भारतातून येणार्या फौजेचा प्रवासही मराठ्यांनी त्रास देत लांबवला. नागपुरच्या भोसलेंना तशा सुचना दिल्या होत्या. त्यापुढे रोहिलेंनाही तशाच सचना होत्या. यामुळे उत्तर भारतातून अत्याधुनिक रसदि इंग्रजांना मिळालीच नाही. ३१ डिसेंबर ला इंग्रज फौजे ने खंडाळ्याचा मुक्काम केला. ४ जानेवारी ला त्या कार्ल्यात आल्या. इंग्रजांनी नंतर रंगवलेला तथाकथित शुर जेम्स स्टुअर्ट मुख्य लढाईच्या १० दिवस आधीच कार्ल्यात महादजी शिंदेंच्या फौजे कडुन मारला गेला. मराठयांनी रसदेचे मार्ग कापल्यामुळे इंग्रज फौज अन्न मिळवण्यासाठी तळेगावाकडे वळली (९ जानेवारी १७७९), पण मराठयांनी तळेगाव सुद्धा रिकामे करुन जाळले होते, आणि पानवठे सुद्धा विषारी होते. अखेर इंग्रजांनी न लढताच माघार घेतली. ११ जानेवारी १९७९ ला त्या आपले जड साहित्य तसेच टाकत उलट वळले, पण मराठाफौजे माग सोडला नाही अखेर इंग्रजांनी वडगाव चा आश्रय घेतला. १३ जानेवारी ला रात्री मराठ्यांनी वडगांव वर हल्ला चढवला तो १४ च्या सकाळी इंग्रजांनी पांढरे निशाण फडकवे पर्यंत तो चालुच ठेवला. अखेर १६ जानेवारी १७७९ ला नाना फडणिसांनी व महादजी शिंदेनी इंग्रजांची संपुर्ण शरणागती मान्य करत तह लादला. तहानुसार इंग्रजांना १७७३ पासुन जिंकलेला सर्व मुलुख परत करायचा होता तसेच मराठ्यांना युद्धखर्च ही द्यायचे मान्य केले.
दुसरे इंग्रज-मराठा युद्ध
दुसरा बाजीराव पेशवा हा अधिकाराने जरी मराठ्यांच्या राज्याचा मुख्य कार्यकारी असला तरी पेशव्यांचे राज्यावरचे नियंत्रण संपुष्टात आल्यात जमा होते. मराठ्यांची सत्ताकेंद्र पुण्यावरुन आता इंदूर व ग्वाल्हेर येथे गेले. महादजी शिंद्याच्या निधना नंतर मराठ्याच्या एकीमधील कच्चे दुवे बाहेर येउ लागले. दुसर्या बाजीरावचा होळकरांनी २५ ऑक्टोबर १८०२ रोजी पुण्याच्या जवळ पराभव केला. पराभवा नंतर होळकरांनी पुण्याचा ताबा घेतला व बाजीराव पळून इंग्रजाकडे आश्रयासाठी गेला व संधी केली जी भासीचा तह या नावाने ओळखली जाते. या तहा नुसार इंग्रजांनी बाजीरावला मराठ्यांच्या सत्ता स्थानी पुन्हा बसवण्यासाठी मदत करण्याचे मान्य केले. बाजीरावच्या या देशघातकी निर्णयाने मराठे संस्थनिकात संतापाची लाट उसळली व ब्रिटीशांविरुद्ध युद्ध पुकारले. मराठे संस्थानिकांनीही फ्रेंचांकडून सैन्य मदत घेतली होती. भारतातील फ्रेंच प्रभुत्व कमी करणे हेही ब्रिटीशांचे धोरण होते. अश्या प्रकारे बाजीराव-इंग्रज सरकार व ईस्ट इंडिया कंपनी विरुद्ध शिंदे व इतर काही मराठा संस्थानिक असे दुसरे इंग्रज मराठा युद्ध सुरु झाले. मराठ्यांचे नेतृत्व शिंद्या कडे होते तर इंग्रजाचे नेतृत्व आर्थर वेलस्ली व जनरल लेक यांनी केले. ब्रिटीशांनी मुख्यत्वे दोन आघाड्या उघडल्या उत्तरेकडील आघाडीचे नेतृत्व लेक यांनी केले तर दक्षिणेकडे वेलेस्लीने आघाडी सांभाळली. इंग्रजांनी मराठ्यांना चुचकारण्यासाठी सरळसरळ संस्थानिकांच्या शहरांवर हल्ल्याची योजना बनवली. शिंद्यानिही शत्रुला लवकर संपवावे या दृष्टीने आपली सेना दक्षिणेला भोसल्यांच्या मदतीला पाठवली. महाराष्ट्रात जालना जिल्ह्यात आष्टी, अकोला जिल्ह्यात आडगाव तसेच चिखलदर्याजवळील गविलगड येथे वेलेस्लीने मराठ्यांचा निर्णायक पराभव केला. उत्तरेकडे जनरल लेक यांनी दिल्ली काबीज केली. यशवंतराव होळकरांनी मराठ्यांची चाललेली ससेहोलपट पाहून युद्धात उतरण्याचा निर्णय घेतला. लष्करी दरारा व मुत्सदेगीरी यावर इंग्रजांना तह करण्यास भाग पाडले. मराठे संस्थानिकांचे सार्वभौमत्व कायम राहिले परंतु मराठ्यांना गुजरात व ओरिसाचा भूभाग गमवावा लागला.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा